मोहाली कसोटीत भारतीय संघाने पहिल्या दिवशी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत २६८ धावांमध्ये इंग्लंडच्या ८ खेळाडूंना तंबूत धाडले आहे. विशाखापट्टणमला फिरकीचे चक्रव्यूह रचून इंग्लंडला नामोहरम करणारे भारतीय शिलेदार आता मोहालीत देखील इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले.