शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मी फोन करुनही त्यांनी घेतला नाही अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. चर्चा आम्ही नाही तर शिवसेनेने थांबवली असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे मुख्यंत्रीपदाचा राजीनाना दिल्यावर सह्यादी अतिथीगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.