”अध्यक्ष महोदय असे सातत्याने म्हणायला हवे का? प्रत्येक वाक्याला म्हणायलाच हवे का? तुम्हाला सभागृहाचा मोठा अनुभव आहे. शिवाय तुम्ही आम्ही २५ वर्षे सोबत होतो. ते लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला सांभाळून घ्याल.” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते नाना पटोले यांचे अभिनंदनाचे भाषण करत होते.