देशातील सर्व राज्यातील पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर, केंद्र सरकार लक्ष देत आहे. त्यासाठी केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी रविवारी सांगितले. समाजासमोर पोलिसांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केली जाते, हे चित्र बदलण्याचा प्रयत्न आगामी काळात केला जाणार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.