विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून शाब्दिक चकमकी झाल्या. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेत राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र, निवडणुकीच्या काळात झालेल्या घुरघोड्या आता समोर येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. “मुख्यमंत्रीपद मागता येऊ नये म्हणून शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी उमेदवार पाडण्यात आले,” असा आरोप राऊत यांनी केला आहे.