राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेनेच त्यांचा घात केला आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षनेता झाले, हा काळानं त्यांच्यावर उगवलेला सूड आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला.