स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतचे उद्गार हे सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या महाराष्ट्राच्या विधानसभेत मी प्रश्न विचारला की आम्ही ब्रिटिशांच्या विधानसभेत आहोत का? कारण ब्रिटिशांच्या विधानसभेत सावरकरांवर बोलण्यावर बंदी असू शकते. पण महाराष्ट्राच्या विधानसभेत सावरकरांबाबतचे उद्गार सभागृहाच्या कामकाजातून काढण्यात आले ही बाब दुर्दैवी आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे