मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ आपली खुर्ची वाचवण्याची कवायत करत आहेत. आपल्या बाजुला बसलेले पक्ष कसे खुश राहतील, याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही उत्तर दिलं जात नाही. म्हणूनच आम्ही सभात्याग केला, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.