कोंढाणा किल्ल्यावरील लढाईचं स्मरण झालं की पहिलं नावं येत तानाजी मालुसरे यांचं. हाच कोंढाणा आज सिंहगड म्हणून ओळखला जातो. आधी लगीनं कोंढाण्याचं नंतर रायबाचं असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शूर मावळ्यानं रात्रीच्या अंधारात चाल करून जात किल्ल्यावर स्वराज्याचा भगवा फडकवला. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर अजय देवगण ‘तान्हाजी’ हा सिनेमा घेऊन येत आहे. त्यानिमित्तानं सिंहगडावरील त्या समर प्रसंगाचा हा वृत्तांत