पंतप्रधान त्यांच्या जागी मोठे आहेत त्यांचा मी आदर करतो पण शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना करणाऱ्या गोयलला आपण उत्तर देणं गरजेचं होतं. त्याचं हे बोलण्याचं धाडस कसं झालं. पण टीव्ही मीडियानं वेगवेगळे विषय पुढे आणत राज्यातील वातावरण मलीन करुन टाकलं, अशी खंत खासदार संभाजी राजे यांनी व्यक्त केली. तुळापूर येथे संभाजी महाराजांच्या ३४० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.