“आपल्या घरात लहान मुलं असतात, त्यामुळे आपण स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारला पाहिजे की, मुलांच्या मनात आपण कुठली स्वप्त पेरतो. त्यांना कुठली मुल्यं शिकवतो,” अशा शब्दांत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तुळापूर येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.