“मी पुणे शहरात अनेक वेळा आले आहे. या शहराने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले असून या भूमीतून महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान व्यक्तिमत्वांनी देशाच्या एकता अखंडतेची शिकवण दिली. याच आधारे आम्हाला घटनेने आमचे अधिकार दिलेत. पण, एका व्यक्तीला देशाच्या एकता-अखंडतेचं स्वप्न अजिबात आवडत नव्हतं आणि ते व्यक्ती म्हणजे मोहम्मद अली जिना. त्यांनी देशाची खुनी फाळणी केली. आता याच आपल्या देशात नवीन जिना प्रेमी तयार झालेत, त्यांना दुसरी फाळणी हवी आहे”, अशा शब्दात सिने अभिनेत्री स्वरा भास्करने सीएएला विरोध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.