पद्मश्री पुरस्कार विजेते पद्मश्री पुरस्कार विजेते सय्यद महबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाई यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना आपला जीवन संघर्ष सांगितला. सय्यदभाई म्हणाले, वडिलांच्या कमी पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह होणं शक्य नसल्याने आम्ही १९४० मध्ये हैदराबादमधून पुण्यात आलो. मात्र, चौथी पर्यंतचे मोफत शिक्षण झाल्यानंतर शाळेची फी भरण्यापुरतेही पैसे नसल्याने माझ्यावर शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. यानंतर मिळेत ते काम करण्याचा निर्णय घेतला होता. १९६० मध्ये माझ्या बहिणीला तिच्या पतीने तलाक दिला होता. यामुळे माझ्या कुटुंबातील सर्व जण तणावात होते. त्यानंतर बहिणीकडे मीच लक्ष देण्याचे ठरवले आणि तिला एक शिलाई मशीन देऊन स्वतःच्या पायावर उभे केले.