पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मोर्चा काढला. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुंटुंब मोर्चात सहभागी झाले. मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकही या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले. हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर आझाद मैदानात राज ठाकरे यांच्या भाषणानं मोर्चाचा समारोप झाला.