मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेचा महामोर्चा आयोजित केला होता. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकला ही भूमिका त्यांनी घेतली आहे. इथले मुसलमान दंगल करणारे नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्रावर टीका केली की भाजपाविरोधी आणि केंद्राच्या निर्णयांचं कौतुक केलं की भाजपाच्या बाजूने असं लेबल लावलं जातं. मात्र मधली काही वाट आहे की नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोर्चाला मोर्चाने उत्तर त्यांनी दिलं. मात्र दगडाला उत्तर दगडाने तलवारीला उत्तर तलवारीने असं ते कुणाविरोधात बोलले ते स्पष्ट झालेलं नाही.