करोना विषाणू संसर्गाने राज्यात गंभीर स्वरूप धारण करू नये, या विचारातूनच शासनातर्फे नागरिकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रगत देशांमध्ये संसर्गाने गंभीर रूप धारण केल्यानंतर या उपाययोजना करण्यात आल्या, भारतात तशी परिस्थिती होण्याआधी यंत्रणा कामाला लागल्या हे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नागरिकांनी शासनाच्या र्निबधांना गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन ज्येष्ठ साथ विकार तज्ज्ञ डॉ. पी. व्ही. साठे यांनी सोमवारी केले. राज्यातील करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने डॉ. साठे यांच्याशी संवाद साधला.