देशभरासह राज्यात दिवसेंदिवस करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशभरात 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली आहे. यामुळे आपली गावं सोडून मोठ मोठाल्या शहरांमध्ये रोजगारसाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्यांची अन्न, पाण्याबरोबरच निवाऱ्याची अडचण झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड भागातील अशा बेघरांना व गरजू नागरिकांना मराठवाडा जनविकास संघाकडून चटणी-भाकरीचे वाटप केले जात आहे.