पालघरमध्ये दोन साधुंची जमावानं केलेल्या निर्घृण हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. या घटनेबाबत पोलिसांच्या भुमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम एकाच व्यक्तीकडे असताना ही घटना कशी काय घडते? असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच या घटनेतील मृत साधुंना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.