करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे रोजी संपत असून यानंतर लॉकडाउन वाढवला जाणार की शिथील करणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल बोलताना काही ठिकाणी लॉकडाउन वाढवणार असल्याचे सुतोवाच दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. सोबतच महाराष्ट्र करोनाशी लढताना कुठेही कमी पडत नसल्याचं सांगितलं आहे.