सध्याच्या संचारबंदीच्या काळात पोलीस आपलं कर्तव्य चोखपणे बजावताना दिसत आहेत. शहरातील पिंपळे गुरव परिसरात आज पोलिसांनी रूट मार्च काढला. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा टॉवेल-श्रीफळ देऊन सन्मानित केलं. तसेच टाळ्या, शंखनाद, पुष्पवृष्टी करून त्यांचं मनोबल वाढवलं. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘महाराष्ट्र पोलिस दलाचा विजय असो’ असा जयघोषही यावेळी करण्यात आला.