जगतसिंघपूर (ओडिशा) : करोना महामारीच्या काळात ओडिशाच्या किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना उद्या अम्फान चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेता इथल्या जगतसिंघपूर भागातील नागरिकांना निवारागृहात हालवण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आलं आहे. एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितलं की, एनडीआरएफच्या ३७ तुकड्या ओडिशाच्या ७ जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. अम्फान चक्रीवादळ २० मार्च रोजी बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागाला धडकणार आहे.