२०१९ विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता येईल असं वातावरण असताना युतीमध्ये नेमका वाद कुठून सुरु झाला याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. २८८ जागा लढण्याचं बहुमत असतानाही माझ्यासह अनेकांचं युती करण्याचं मत होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनीही युती केली नाही तर आपण संधीसाधू पक्ष वाटू शकतो असं सांगत युती करण्याचा सल्ला दिला. आम्ही आमचे बंडखोर मागे घेतले मात्र शिवसेनेने घेतले नाही.