कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन थोडेफार विस्कळीत झाल्याचे दिसून आले. दुपारी साडेतीन वाजेनंतर पाऊस सुरू झाला. आज सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. शिवाय, शेतीकामांनाही यामुळे वेग येणार आहे.