आधी करोना, मग अम्फान.. आणि आता पश्चिमी किनारपट्टीवर वादळ.. पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने ताज्या स्थितीचा अंदाज घेऊन निसर्ग चक्रीवादळ अत्यंत तीव्र असेल अशी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला निसर्ग वादळाचा धोका आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पश्चिम किनारपट्टीवर वादळाची काय परिस्थिती आहे.