नवी दिल्ली : करोना महामारीच्या काळात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांदरम्यान व्हर्च्युअली शिखर परिषद पार पडत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यामध्ये ऑनलाइन संवाद झाला, अशा प्रकारे डिजिटली माध्यमातून होत असलेली भारतासाठी ही पहिलीच शिखर परिषद आहे. यावेळी मॉरिसन यांच्याशी चर्चेदरम्यान मोदींनी भारताच्यावतीनं कोविड-१९ आजारात बळी पडलेल्या ऑस्ट्रेलियातील नागरिकांप्रती शोक भावना व्यक्त केली.