तिनसुकीया (आसाम) : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यात असलेल्या ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका तेलविहिरीला लागलेली आग पसरतच चालली आहे. मंगळवारी गॅस गळतीमुळे ही आग लागली होती. ती अद्यापही धुमसतच आहे. या घटनेत आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून या तेलविहिरीतून गॅसची गळती होत होती. ही गळती बंद करताना या विहिरीला आग लागली.