“आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात आयएफएससी मुंबईतच झालं पाहिजे. पण, मोदींसमोर राज्यातील भाजपा नेतेमंडळींची कदाचित बोलण्याची हिंमतच होत नसावी,” असं म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ‘लोकसत्ता‘तर्फे आयोजित ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा‘ या वेबसंवादात अशोक चव्हाण सहभागी झाले होते.