करोना संकट आलं आणि लॉकडाऊन झालं, यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. परंतु, काही महिलांनी एकत्र येत इको फ्रेंडली महिलांच्या समूहाने कागदी बॅग बनवली आहे. अनेक महिला आणि तरुणी सॅनिटरी नॅपकिन कचऱ्याच्या डब्यात टाकतात त्या थेट कचरावेचकापर्यंत पोहचतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महिलांनी एकत्र येत रोजगार आणि महिला आणि कचरा वेचकांच्या समस्यांवर उपाय काढत पर्यायी व्यवस्था म्हणून कागदी बॅग काढली आहे. जेणेकरून कचरा वेचक महिलांना, पुरुषांना त्या कागदी बॅगेत सॅनिटरी नॅपकिन आहे हे समजेल आणि सुरक्षित रित्या हाताळले जाईल. असा या मागचा हेतू आहे. या व्यवसायातून महिलांना महिन्याकाठी चार ते पाच हजार रुपये मिळतात. कुटुंब आणि लहान मूल सांभाळून सकाळी काही तास आणि संध्याकाळी काही तास काम करतात. त्यामुळे त्या देखील या कामातून आनंदी आहेत. ही संकल्पना मीना अतुल शितोळे यांची आहे.