ज्ञानोबा माऊलींची पालखी आळंदी येथून निघते आणि पुण्यातील दिवे घाटातून ती पुढे प्रस्थान करते. टाळमृदुंगाच्या गजरात विठू माऊलींचे नामस्मरण करत पालखी पंढरपूर कडे रवाना होते. यंदाच्या वर्षी सर्व वारकऱ्यांना दिवे घाटात आपल्या लाडक्या विठोबाचे दर्शन होणार आहे. घाटामध्ये विठ्ठलाची ६५ फूट उंचीची मूर्ती स्थापण्यात आली आहे. अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी ही मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विठू माऊलींच्या मस्तकावर जो गंध आहे, तो पंचधातूंनी बनवण्यात आला आहे. या गंधाला १ किलो सोन्याचा मुलामा दिलेला आहे.