हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि राज्यातल्या किनारपट्टी भागात मुसळघधार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी नसली, तरीही पालिकेचे सफाई कर्मचारी आपलं नित्याचं काम करत आहेत. पावसाळा आली की मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट गाठणारे मुंबईकर मात्र यंदा घरातच आहेत, करणार काय परिस्थितीच बिकट आहे ना !