केंद्र सरकारने मुस्लीम समाजातील महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे. या पार्श्वभूमीवर तिहेरी तलाक विरोधी कायदा केला. या कायद्याचे मुस्लीम समाजातून स्वागत देखील करण्यात आले. एवढेच नाहीतर या कायद्यानंतर तिहेरी तलाक प्रथेस चाप बसेल, अशी शक्यता होती. मात्र अशा घटना समाजात अद्यापही घडत असून पुण्यातील एका उच्चशिक्षित मुस्लीम महिलेसोबत निकाह, तलाक, हलाला, निकाह व पुन्हा तलाक अशी घटना घडली आहे. या घटनेमुळे मुस्लीम महिलांचे हाल काही संपेना असंच म्हणण्याची वेळ आली आहे.