करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील सर्वात मोठी व्यवस्था मुंबई मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अल्पकाळात उभारली गेली आहे. राज्यात दौरे करत फिरणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काम एकदा डोळ्याखालून घालावे. हे भव्य काम पाहून त्यांचे डोळे पांढरे होतील, असा टोला ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेमध्ये लगावला.