पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाउनची घोषणा झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील लोकांनी अन्नपदार्थांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. हा लॉक़डाउन पुन्हा किती काळ चालेल याची खात्री नसल्याने रोजच्या जेवणासाठी लागणारं पीठ दळून आणण्यासाठी नागरिकांनी पिठाच्या गिरण्यांमध्ये गर्दी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर दळणं गिरणीत दळण्यासाठी आली आहेत की, त्यासाठी आता दोन दिवसांचं वेटिंग आहे. गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली असल्याचे एका गिरणीचालकानं म्हटलं आहे.