याबाबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश एक बाजार’ अशी भूमिका घेतली असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशात कोठेही विकता येतो. तसेच व्यापाऱ्यांनाही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कुठूनही शेतमाल खरेदी करता येते. बाजार समितीची मक्तेदारी मोडून काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अशावेळी आयुक्त गायकवाड यांनी घेतलेली भूमिका ही एकांगी स्वरूपाची आहे. शेतकऱ्यांवरी दंडात्मक कारवाई बंद करावी.