महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९५. ३० टक्के लागला आहे. यंदा दहावीच्या निकालात राज्यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के लागला, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ९२ टक्के आहे. मुलींचा निकाल ९६.९१ टक्के लागला तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे.