राज्य शासनानं ऊसतोड मजुरांना न्याय द्यावा, अन्यथा १ ऑक्टोबर रोजी होणारा संप अटळ असेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांसंदर्भात आंबेडकर यांनी आज पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.