”अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबद्दलची माहिती त्यांच्या पत्नीला देखील दिली गेलेली नव्हती. त्यांना दोन पोलिसांकडून मारहाण झाली आहे. शिवाय, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का दिला गेला व त्यांचे घर तीन तासांसाठी बंद करण्यात आले. त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झालेली आहे आणि ज्या ठिकाणी दुखापत आहे, तिथे बांधलेली पट्टी देखील पोलिसांकडून काढण्याचा प्रयत्न झाला.” असा आरोप अर्णब गोस्वामीच्या वकिलाकडून करण्यात आला आहे.