२०२४ मध्ये भाजपा ५० आमदाराच्या पुढे जाणार नाही – जयंत पाटील
राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून राज्यातील आगामी निवडणुका एकत्र लढणार आहोत. २०२४ पर्यंत आम्ही एकत्र राहिल्यास भाजपा ५० आमदारांच्या पुढेही जाणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पुण्यात म्हटलं आहे.