केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांत २९ महिलांचा समावेश असून ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचंही नाव आहे. “मी हाफ टाईम नववी पास, मी कशी जाणार पद्मश्रीपर्यंत…हा माझ्यासाठी एक धक्काच आहे. मी फक्त जगत गेले, चालत गेले. फक्त मागे वळून पाहिले एवढंच,” अशी प्रतिक्रिया त्यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दिली आहे.