अनाथ मुलं, मतिमंद, गतिमंद मुलं, वृद्धाश्रमातील निराधार वृद्ध यांच्याकडे समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून बघितलं जातं. अनेक सेवाभावी संस्था यांचा आधार बनतात. अशा संस्थांमध्ये राहणाऱ्या निराधार लोकांना आनंद मिळावा. त्यांच्या आयुष्य हास्याने उजळून निघावे म्हणून पुण्यात ‘मधुरांगण’चा जन्म झाला. हे मधुरांगण आता या लोकांसाठी हक्काचं घर म्हणून उदयास आले आहे.