अहमदनगरमधील कोपरगाव शहरात भुलीचे इंजेक्शन देऊन गाईंना गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव फसला. याच परिसरात काही दिवसांपूर्वी उमेश नाईक यांच्यादेखील गायी भूल देऊन इनोव्हा गाडीतून चोरून नेल्याची घटना घडली आहे.