“मानव सेवा हीच ईश्वर सेवा” ही म्हण आपण नेहमीच ऐकत आलोय. मात्र सध्या या करोनाच्या काळात औषधांचा काळाबाजार, एम्बुलन्सची वाढलेली किंमत, ऑक्सिजन आणि बेड्स साठी मोजावे लागणारे जास्त पैसे पाहता आपण माणुसकी हरवून बसलो आहोत का? असा प्रश्न निर्माण होतो. पण या नकारात्मक परिस्थितीतसुद्धा माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव सध्या बुलढण्याचे रहिवासी घेतायत. चला थेट तिथे जाऊनच पाहुयात नेमकं असं काय घडतंय…