जळगावच्या सहकारी औद्योगीक वसाहतील समृध्दी केमिकल ही कंपनी तीन दिवसांपासून बंद होती. यामुळे येथील टाकीमध्ये गाळ साचला होता. हा गाळ साफ करण्याचे काम या कामगारांना सांगण्यात आले होते. या घटनेत पहिल्यांदा एक कामगार गाळात अडकला. त्याला सोडविण्यासाठी इतर दोन जण आत गेले असता ते देखील यात अडकले. यातच तिघांचा गुदमरून मृत्यू झाला.