आंबील ओढा झोपडपट्टीतील रहिवासांचे घर तोडण्याचे सत्र पुणे मनपाने सुरु केले आहे. त्याला त्वरित स्थगिती देण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. त्याचबरोबर आंबील ओढा झोपडपट्टी धारकांची सोसायटी निर्माण करावी तसेच पावसाळ्यात येथील रहिवासांचे स्थलांतर न करू नये अशा सूचना त्यांनी पुणे मनपाला दिल्या आहेत.