विधान परिषदेवरील १२ आमदारांची रखडलेली नियुक्ती आणि एकदा सरकारी विमानातून राज्यपालांना खाली उतरावे लागले असल्याने राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोघांमधील संघर्ष कायम असतानाच साकीनाका बलात्कार व हत्या प्रकरणावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात पत्रसंघर्ष रंगला आहे. भाजप महिला आमदारांच्या मागणीनुसार या प्रकरणावर विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलावण्याबाबत राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी खरमरीत उत्तर दिले.#UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #MaharashtraCM