संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्यांना आश्रय देण्याचा इतिहास पाकिस्तानच्या नावे आहे, असा टोला भारताने शेजारच्या राष्ट्राला लगावला आहे. पाकिस्तानने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत जगातील सर्वात महत्वाच्या मंचांपैकी एक असणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर काश्मीरचा उल्लेख केल्याने भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान हे दहशतवादाला खतपाणी घालणारं राष्ट्र असल्याचं जागतिक मंचावरुन अधोरेखित केलंय.#India #Pakistan #ImranKhan #UnitedNationsGeneralAssembly