मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ८ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात अतिरेक्यांशी लढून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी शूरवीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. २६/११ दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,पोलीस महासंचालक संजय पांडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.