केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतंच राज्यातील सरकार पुढील वर्षी बदलण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येणार असल्याचं विधान नारायण राणेंनी केल्यानंतर आता अजून एक केंद्रीय मंत्री असलेले रामदास आठवले यांनी देखील राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या भवितव्याविषयी भाकित वर्तवलं आहे. सांगलीमध्ये पत्रकारांनी नारायण राणेंच्या विधानाविषयी विचारणा केली असता रामदास आठवलेंनी त्याला दुजोरा दिला. तसेच, अडीच वर्ष झाल्यानंतर राज्यात शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल, असं देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.