महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावादावरून एकनाथ खडसे यांची राज्यसरकारवर टीका
महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावाद आता चिघळत असून त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते Eknath Khadse यांनी प्रतिक्रिया देताना 'महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद मिटवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे' अशी टीका केली. 'केंद्र आणि राज्यसरकारमध्ये भाजपाची सत्ता असताना त्यांनी यामध्ये लक्ष घालायला हवं' असे वक्तव्यदेखील खडसेंनी केले.