ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात मागील १२ दिवसांपासून खेळाडू जंतर मंतरवर कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत. त्यातच बुधवारी ३ मेच्या रात्री कुस्तीपटू आणि पोसिलांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे परिसरात एकच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पदकं सरकारला परत करण्याचा इशाराही दिला आहे.